Powered By Blogger

Wednesday, March 10, 2010

स्वयंसेवी संस्था: समाजकारण की भांडवली राजकारण ?
-विवेक जाधवर

अधिशास्ता वर्ग एखाद्या प्रदेशातील जनतेवर दोन मार्गांनी अधिराज्य स्थापन करतो. पहिला मार्ग हा राजकीय मार्ग असतो, यामध्ये दंडशक्तीद्वारे जनतेचे दमन केले जाते. दुसरा मार्ग हा सांस्कृतिक असतो, या मार्गामध्ये वैचारिक -नैतिक संस्थांद्वारे आपल्या विचाराचे प्रभुत्व स्थापन केले जाते. या मार्गाला समाजाच्या संमतीचा आधार असतो.
- अंतोनियो ग्रामची
भारतातील स्वयंसेवी क्षेत्राचा विचार करताना अंतोनियो ग्रामची या माक्र्सवादी विचारवंताचा वरील विचार नजरेआड करून चालणार नाहीत. ग्रामचीने मांडलेली धुरीणत्वाची (हेजेमनी) ही संकल्पना आपल्याला आजच्या काळातील स्वयंसेवी क्षेत्र व त्याआड दडलेले भांडवली राजकारण समजून घेण्यास उपयोगी पडते. पाश्चात्य भांडवली राष्ट्रे जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या वित्तीय संस्थांच्या सहकार्याने जागतिकीकरणाचा प्रकल्प अंमलात आणत आहेत. हा प्रकल्प अंमलात आणण्यासाठी व त्याला लोकसंमतीच्या सहाय्याने ‘मानवीङ्क चेहरा प्राप्त करून देण्यासाठी स्वयंसेवी संस्था महत्त्वाची भूमिका बजावत आहेत.
आज महाराष्ट्रामध्ये कोकण, मराठवाडा या मागास मानलेल्या भागामध्ये व मुंबई व पुण्यासारख्या शहरांमध्ये मोठ्या प्रमाणात स्वयंसेवी संस्था आहेत. सर्वसाधारणपणे या संस्था पर्यावरण, आदिवासी विकास, बचतगट, पाणलोटक्षेत्रविकास, सार्वजनिक आरोग्य, स्त्री आरोग्य, झोपडपट्टीतील नागरिकांचा विकास, रोजगार हमी योजना, शिक्षण, आपत्ती व्यवस्थापन यासारख्या विषयामध्ये काम करतात. जागतीक स्तरावर आशिया, अफ्रिका व लॅटिन अमेरिकेतील देशांमध्ये कमीत कमी ५०,००० स्वयंसेवी संस्था आहेत. पाश्चात्य विकसीत राष्ट्रे, वित्तीय संस्था यांच्याकडून या संस्थांना १० अब्ज डॉलर्सहूनही अधिक निधी मिळतो.
आज स्वयंसेवी क्षेत्राला लोकमान्यता व राजमान्यता मिळालेली आहे. भारतामध्ये आज स्वयंसेवी क्षेत्रातील पगारी कार्यकत्र्यांची संख्या केंद्रीय कर्मचाèयांच्या संख्येपेक्षा जास्त आहे. आजचा मध्यमवर्गीय तरूण याकडे ‘करिअरङ्क म्हणून पाहतो आहे. अशा वेळी त्याच्या उगम, विकासाची चिकित्सा करणे व त्याचे तात्त्विक आधार उलगडून दाखवणे गरजेचे आहे. तत्पूर्वी त्याची ऐतिहासिक पाश्र्वभूमी थोडक्यात समजून घेऊ.
स्वयंसेवी संस्थांची ऐतिहासिक पाश्र्वभूमी :
१९ व्या शतकामध्ये महाराष्ट्रामध्ये विविध स्वरूपाच्या संस्थांच्या पायाभरणीला सुरवात झाली. आजच्या काळातील स्वयंसेवी संस्था व त्या काळातील संस्था या उद्दिष्टे, दृष्टिकोन, मार्ग या सर्वच बाबतीत पूर्णत: वेगळ्या आहेत. परंतु, समाजबदलासाठी (अनुकूल अथवा प्रतिकूल या दोन्ही अर्थाने ) संस्थात्मिकरणाचे होत असलेले प्रयत्न, केवळ या मुद्यावरून तुलना होऊ शकते.
१९ व्या शतकामध्ये ब्रिटिशांपासून मराठी राज्य वाचवण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्यानंतर महाराष्ट्रातील नेतृत्वाने वेगळा मार्ग पत्करला. हा मार्ग होता आत्मपरीक्षणाचा व प्रबोधनाचा. महाराष्ट्र त्यावेळी जुनाट रुढी परंपरांनी ग्रस्त होता. अशा वेळी पाश्चात्य ज्ञानाच्या प्रकाशात येथील सामाजिक घडीची पुनर्रचना करण्याचा प्रयत्न सुधारकांनी केला. ही पुनर्रचना करण्यासाठी वैचारिक प्रबोधनाबरोबर संस्थात्मक जाळे उभे करायला या सुधारकांनी सुरवात केली. परमहंस मंडळी, सत्यशोधक समाज, विधवाविवाहोत्तेजक मंडळी, प्रार्थना सभा, सार्वजनिक सभा यासारख्या अनेक संस्था स्थापन करण्यात आल्या. न्या. रानडे तर याबाबतीत अग्रभागी होते. एकीकडे समाजाचे प्रबोधन करणे तर दुसरीकडे ब्रिटिश सत्तेचे शोषक रूप उघडे करणे असे दुहेरी काम या काळातील संस्थांनी केले. समाजकारण व राजकारण यांची त्यांनी उत्तम सांगड घातली होती.
टिळकांच्या काळात राजकीय उद्दिष्ट प्रमुख बनल्यामुळे समाजसुधारणावादी संस्था मागे पडल्या. परंतु गांधीजींच्या काळात या संस्था वेगळ्या स्वरूपात समोर आल्या. गांधीजींना महाराष्ट्रातील संस्थात्मक जाळ्याची कल्पना आल्यामुळेच त्यांनी महाराष्ट्राला ‘कार्यकत्र्यांचे मोहोळङ्क म्हटले होते. गांधीजींच्या काळातच आजच्या स्वयंसेवी संस्थांशी नातं सांगणाèया संस्था महाराष्ट्रात निर्माण झाल्या. या अर्थाने गांधीजींनी प्रथम स्वयंसेवी संस्थांची मुहूर्तमेढ रोवली असे म्हणता येऊ शकते. ख्रिश्चन मिशनèयांच्या सेवाभावीवृत्तीबरोबरच गांधीजींच्या विचारांचा त्यावर प्रभाव होता. या संस्था निर्मितीचा उगम गांधींजींच्या संघर्ष पद्धतीत सापडतो. गांधीजींच्या एकूण कार्यामध्ये संघर्ष-शांतता-संघर्ष असे टप्पे दिसतात. यातील शांततेच्या टप्प्यामध्ये विधायक कार्य करण्यासाठी गांधीजींनी स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या. या शांततेच्या कालखंडामध्ये विधायक कार्याच्या माध्यमातून जनतेची नाळ संघर्षाशी जोडून गांधींजींनी साम्राज्यवादाशी लढा उभा केला. गांधीजींपासून प्रेरणा घेऊन बाबा आमटे, कुंदर दिवाण, शिवाजीराव पटवर्धन यांनी स्थापन केलेल्या संस्था या विशुध्द मानवतावादावर आधारलेल्या होत्या. आज फोफावलेल्या संस्था व गांधींजींच्या स्वातंत्र्यपूर्वकालीन संस्था यांच्यामध्ये गुणात्मक फरक आहे. गांधीजींच्या संस्था या आजच्या संस्थांप्रमाणे छुप्या व्यावसायीक उद्देशाने स्थापन केलेल्या नव्हत्या.
स्वातंत्र्यानंतर मात्र अनेक गांधीवादी संस्था केवळ ‘संस्थाङ्क बनून राहिल्या. ब्रिटिश साम्राज्यवादाशी लढा दिल्यानंतर येथील सरंजामशाही व विषमतामूलक परिस्थितीशी लढा द्यायचा आहे याचा त्यांना विसर पडला. संघर्षाशी असणारं नातं संपून त्या आपल्याच कोषात मग्न झाल्या. त्यामुळे १९६० ते १९८० पर्यंतच्या कालखंडात स्वयंसेवी संस्थेच्या विकासाला पठारी अवस्था प्राप्त झाली. या अवस्थेला कारणीभूत होती निर्माण झालेली नवीन सत्ताकेंद्रे व संघर्षशील सामाजिक चळवळी. या काळात एकीकडे ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद अशा स्थानिक सत्ताकेंद्राचा विकास झाला. या सत्ताकेंद्रामध्ये स्वातंत्र्यलढा व संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीतील अनेक सक्रिय कार्यकर्ते सामावले गेले. उर्वरित कार्यकर्ते हे सहकारी संस्थामध्ये सामावले गेले. तर दुसरीकडे साचेबध्द पक्षीय राजकारणाला कंटाळून, पक्षबाह्य राजकारण करण्याच्या मिषाने अनेक जण सामाजिक चळवळीकडे ओढले गेले. या चळवळी अधिक उग्र व संघर्षशील होत्या. उदा. नक्षलवादी चळवळ, दलित चळवळ इ. या चळवळी डाव्या पुरोगामी विचारांशी बांधीलकी मानणाèया होत्या. वर्गान्त व जात्यन्त यासाठी त्या संघर्षरत होत्या. जागृत राजकीय जाणीवांंमुळे या चळवळींचे अराजकीयकरण झाले नाही. यांचे स्वरूप निखळ परिवर्तनवादी असल्यामुळे त्यांचे ‘स्वयंसेवी संस्थांङ्क मध्ये रुपांतर होऊ शकले नाही.
१९८० नंतरचे स्वयंसेवी क्षेत्र व नवचळवळी
१९८० च्या दशकाच्या सुरवातीपासूनच आंतरराष्ट्रीय स्तरावर स्वयंसेवी संस्थांना जाणीवपूर्वक महत्त्व देण्यात येऊ लागले. १९८५ मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या चाळीसव्या आमसभेत ५ डिसेंबर हा ‘वॉलंटरी वर्क डेङ्क म्हणून घोषित करण्यात आला. यानंतर स्वयंसेवी क्षेत्राला नवी पालवी फुटली. भारताने देखील सातव्या पंचवार्षिक योजनेत (१९८५-१९९०) स्वयंसेवी क्षेत्राला अधिकृतरीत्या स्थान दिले.
जागतिकीकरणाचे बोट धरून आलेल्या छुप्या व्यावसायिक स्वयंसेवी संस्थांचे स्वरूप हे १९व्या शतकातील अथवा गांधी काळातील संस्थां प्रमाणे नव्हते. जागतिक बँक, जागतिक नाणेनिधी संस्था यांच्याबरोबरच युएसएड, फोर्ड फाऊंडेशन, केअर, अ‍ॅक्शन एड, नोविब, ख्रिश्चन एड यासारख्या अनेक वित्तीय संस्थांचे पाठबळ या स्वयंसेवी संस्थांना होते. या संस्थांनी स्वत:च्या कार्यक्रमाच्या अंमलबजावणीसाठी काही तात्त्विक आधार, परिभाषा ही शोधलेली होती. तात्त्विक आधार म्हणजे उत्तर आधुनिकतावाद. उत्तर आधुनिकतेने आधुनिकतेच्या प्रकल्पातील विवेकवादाची, वर्चस्ववादी विज्ञान व तंत्रज्ञानाची आणि सर्वंकषवादी राज्यसंस्थेची सखोल चिकित्सा केली होती. ही चिकित्सा करताना विकेंद्रीत शासनव्यवस्था, स्थानिकांची स्वायत्तता, शाश्वत विकास यासारख्या बाबींचा पुरस्कार केला. १९८० नंतरच्या नर्मदा बचाव आंदोलना सारख्या नवचळवळींनी ही भाषा स्वीकारली, अर्थातच ही भाषा पारंपारिक वर्गान्त व जात्यन्तवाद्यांप्रमाणे नव्हती. त्यांनी उत्तर आधुनिकतेच्या बलस्थानांचा, त्यांच्या आधुनिकतेवरील टिकात्मक विश्लेषणांचा डोळस उपयोग त्यांनी केला. प्रचलित भांडवली विकासाचे प्रारूप व त्यातील वर्चस्ववादी तंत्रशाही यांच्याबरोबरच साम्यवाद्यांच्या सर्वंकषवादी राज्यालाही त्यांचा विरोध होता. नैसर्गिक संसाधनांवर स्थानिकांचे हक्क, विस्थापनाला विरोध ही या चळवळीची गाभ्याची वैशिष्ट्ये होती. नर्मदा बचाव आंदोलन, टिहरीतील चिपको आंदोलन ही या संबंधीची काही प्रातिनिधिक उुाहरणे. या चळवळीने स्पष्ट राजकीय भूमिका घेतली नाही, परिणामी विस्थापन व पर्यायी विकासाचे प्रश्न हे मुख्यत: राजकीय प्रश्न असताना देखील चळवळीला काही मर्यादित बाबतीतच व्यापक जनाधार मिळू शकला. या चळवळीशी संबंधीत अनेकांची समग्रतावादी विचारांशी बांधिलकी नसल्यामुळे त्यांचे वेगाने अराजकीयकरण झाले. यांनी स्वत:च्या स्वयंसेवी संस्था स्थापन केल्या.
स्वयंसेवी संस्थांनी उत्तर आधुनिकतेला जवळ असणारी लोकशासन, सक्षमीकरण, शाश्वत विकास, वंचिताभिमुखी नेतृत्व अशी नवचळवळीची भाषा उचलली. परंतु ही भाषा वित्तपुरवठा करणाèया आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था व शासकीय संस्थांशी जोडली गेलेली होती. जनतेच्या चळवळीमध्ये शिरून, त्यांची भाषा आत्मसात करून, स्थानिक नेतृत्वाला व कार्यकत्र्याला आर्थिक स्त्रोताच्या, छद्म वैचारिकतेच्या बळावर स्वत:मध्ये सामावून घेण्याचा प्रयत्न स्वयंसेवी संस्थांनी केला. त्यामुळे स्थानिक पातळीवरील चळवळींचे मोठ्या प्रमाणात अराजकीयकरण झाले. त्यामुळे व्यवस्था बदलाऐवजी व्यवस्थेमध्ये छोटे -छोटे बदल करत राहणे हेच त्यांचे काम झाले.
१९९० नंतरचे स्वयंसेवी क्षेत्र
स्वयंसेवी संस्था एकीकडे चळवळीची भाषा आत्मसात करून, तिला आतून दुर्बळ बनवण्याचे काम करत असताना, महाराष्ट्रात मात्र काँग्रेसने १९८०च्या दशकाच्या सुरवातीपासूनच उदारीकरण व खाजगीकरणाच्या धोरणाला पाqठबा देऊन, बहुराष्ट्रीय कंपन्या व परकीय गुंतवणूकीला प्रोत्साहन द्यायला सुरवात केली होती. नंतर हेच धोरण शिवसेना, भाजप यांनीही स्वीकारले. सर्वांसाठीच खाजगीकरण हा परवलीचा शब्द झाला. या धोरणाच्या स्वीकारामुळे राज्याने कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेचा ‘अधिकृतरीत्याङ्क त्याग करण्यास सुरवात केली. राज्याने अनेक क्षेत्रातून माघार घेण्यास सुरवात केल्यामुळे निर्माण झालेली पोकळी स्वयंसेवी संस्थांनी भरून काढण्यास सुरवात केली. १९९० नंतर मात्र राज्यसरकारने अधिक उघडपणे स्वयंसेवी क्षेत्राला प्रोत्साहन दिले. सार्वजनिक आरोग्य, प्रौढशिक्षण, एडस् विरोधी अभियान, पाणलोटक्षेत्र विकास यासारखे अनेक विषय लोकसहभागाच्या नावाखाली स्वयंसेवी संस्थावर सोपवायला सुरवात केली. परिणामी, १९९० नंतर चळवळीतील कार्यकर्ते व नेते मोठ्या प्रमाणात आकर्षित झाले व त्यांचे एनजीओकरण झाले. महाराष्ट्रातील राजकीय व सामाजिक चळवळींना ओहोटी लागली. लोकसहभाग, समुदायाचे सक्षमीकरण, विकेंद्रीकरण या संकल्पना मूलत: लोकशाहीला सखोल व आशयसंपन्न बनवणाèया आहेत. परंतु, स्वयंसेवी संस्थांनी या परिभाषेच्या आवरणाखाली खाजगीकरणाला खतपाणी घातले व शासनाच्या जनतेप्रतीची जबाबदारी टाळण्याला अधिमान्यता दिली.
स्वयंसेवी संस्थांच्या वाढीच्या संदर्भात नवभांडवलशाहीतील नागरी समाज (सिव्हिल सोसायटी) म्हणजे अर्थार्थी qकवा निर्वाहक्षेत्रीय समाज या संकल्पनेचा विचार करणेही भाग पडते. लोकशाहीमध्ये नागरिकांच्या सक्रिय सहभागावर आधारलेली अधिसत्ता ते समाजात स्वत:चे हितसंबंध जोपासण्यासाठी शासनावर मुळीच अवलंबून नसलेल्या संस्था, सत्ताकेंद्रे व त्यांची परस्परपोषक जाळे उभारणारी अधिसत्ता इथपर्यंत नागरी समाजाची वाटचाल आज झालेली आहे. शासनाने स्वत:ला शांतता व सुव्यवस्थेपुरते मर्यादित ठेवून नागरी समाजाच्या स्वायत्त सत्ताकेंद्रांनी सामाजिक धोरणे राबवावीत ही बाब आता रूढ होत चालली आहे. प्रस्थापित शासनसंस्थेतील नोकरशाही, भ्रष्टाचार यासारख्या गोष्टींना कंटाळलेल्या लोकांमधील काही गटांना या बहुसत्तात्मक स्वायत्त नागरी समाजाचे आकर्षण वाढू लागले व यातून स्वयंसेवी संस्थांच्या वाढीलाही बळ मिळाले.
१९६० पासून ते आत्तापर्यंत महाराष्ट्रात प्रादेशिक विकासाचा असमतोल राहिला आहे. मुंबई, पुणे, नाशिक त्रिकोणातच औद्योगिक विकास एकवटलेला दिसतो. सहकारी संस्थांमुळे पश्चिम महाराष्ट्रचा काही भाग समृध्द झालेला दिसतो. तर कोकण, मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र यांचा बहुतांशी भाग मागास राहिलेला दिसतो. जातीप्रथा, विषमता, शेतीची दुरावस्था यासारख्या अनेक समस्यांबरोबरच जनतेमध्ये असंतोषाचे वातावरण आहे. राज्यात ३२ लाख सीमांत शेतकरी, २७ लाख छोटे शेतकरी व ४५ लाख भूमिहीन शेतमजूर आहेत, ३५% कुटुंबे दारिद्रयरेषेखालील आहेत, मोठ्या शहरामध्ये एक तृतीयांशहून अधिक लोक झोपडपट्टयांमध्ये राहतात. अशा वातावरणात निर्माण होऊ शकणाèया चळवळींतील नेतृत्वाला व कार्यकत्र्याला स्वत:मध्ये सामावून स्वयंसेवी संस्था पायबंद घालू शकतात. एका प्रकारे त्या भांडवली सत्तेसाठी ‘सेफ्टी व्हॉल्वङ्क म्हणून कार्यरत होतात. जनतेमध्ये तीव्र असंतोष असताना व्यवस्थाबदल होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्था ‘सेफ्टी व्हॉल्वङ्क म्हणून कशा कार्यरत होतात हे पाहण्यासाठी लॅटिन अमेरिकेतील बोलिव्हियाचे उदाहरण पाहणे महत्त्वाचे आहे. बोलिव्हियाच्या शासनाने उ-जा-खा च्या धोरणाचा स्वीकार केल्यानंतर तीव्र सार्वजनिक असंतोष निर्माण झाला. या असंतोषाला वाट करून देण्यासाठी आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्थांनी तेथील गरिबी निर्मूलनासाठी, स्वयंसेवी संस्थामार्फत प्रचंड आर्थिक मदत पाठवली. १९९० मध्ये एकूण ७३८ दशलक्ष डॉलर्स इतकी मदत देण्यात आली. स्वयंसेवी संस्थांची संख्याही मोठ्या प्रमाणात वाढली. १९८० पूर्वी बोलिव्हीयात १०० स्वयंसेवी संस्था होत्या, १९९२ साली त्यांची संख्या ५३० झाली.
स्वयंसेवी संस्थांची कार्यशैलीही आपत्तीजनक आहे. विषयाचा ‘प्रोजेक्टकेंद्रीङ्क विचार, संस्थेचे जनतेच्या ऐवजी वित्तीय संस्थेच्याप्रती असणारे उत्तरदायित्व, जनतेपासून दूर जाण्याची प्रवृत्ती, सामाजिक समस्या सोडवण्यासाठी प्रबोधन, संघर्ष यांच्याऐवजी उथळ व्यवस्थापकीय मार्गाचा आग्रह, भ्रष्ट कारभार, अकार्यक्षमता, संस्थाचालकाची हुकूमशाही, संस्थेचा वित्तीय स्त्रोत टिकवण्यासाठी केली जाणारी तडजोड, कार्यकत्र्याची होणारी पिळवणूक, वैचारीक बैठकीचा अभाव, मध्यमवर्गीय चष्म्यातून सामजिक प्रश्न समजून घेण्याची वृत्ती यासारख्या अनेक अपप्रवृत्ती दिसून येतात.
एकूणच, स्वयंसेवी संस्थांचा कारभार समजून घेण्यासाठी, संस्थालक्ष्यी व व्यक्तीलक्ष्यी विश्लेषण करण्याऐवजी, त्यांचे काळाच्या ओघात बदलत गेलेले स्वरूप, नवभांंडवलशाही, वित्तीय संस्था, पाश्चात्य भांडवली राष्ट्रे, उत्तर आधुनिकतेचा विचारव्यूह, त्यांची तात्त्विक जडणघडण यांच्या संदर्भात विचार करणे गरज़ेचे आहे.

संदर्भ:
१. जाधवर विवेक, स्वयंसेवी क्षेत्राची चळवळ, सकाळ, १ मे २००८
१. पळशीकर सुहास, ...भोळे भा.ल., बेडकिहाळ किशोर (संपा.) बदलता महाराष्ट्र (एन.डी. पाटील गौरव ग्रंथ)
२. पेटृास जेम्स, एनजीओचे साम्राज्य,राहुल वैद्य (अनु.) आंदोलन (ऑक्टोंबर-नोव्हेंबर २००६)
३. बापट राम, आधुनिकता, उत्तर आधुनिकता व सुनिती सु.र.(संपा), विकासाच्या नव्या वाटा
४. बापट राम, भांडवलशाहीच्या बदलत्या दिशा आणि पुरोगामी जबाबदाèया, किशोर बेडकिहाळ (संपा.), विचारवेध संमेलने- अध्यक्षीय भाषणे खंड -१


माहिती अस्त्राची चार वर्षे
विवेक हरिदास जाधवर
माहितीचा अधिकार अधिनियम, २००५ अमंलात येऊन लवकरच चार वर्ष पूर्ण होतील. या बद्दल, महाराष्ट्र शासन माहिती अधिकार सप्ताहही साजरा करत आहे. या निमित्ताने या कायद्याची सद्य:स्थिती मांडणे आवश्यक आहे. पारदर्शकता, उत्तरदायित्व व लोकसहभाग या शब्दांना या कायद्याच्या निमित्ताने नव्याने अर्थ प्राप्त झाला आहे. हा एकमेव कायदा आहे, ज्याच्या आधारे जनता प्रशासनावर लक्ष ठेऊ शकते. माहितीचा अधिकार हा मूलभूत अधिकार म्हणून मान्य झाला आहे. गोपनियतेच्या संस्कृतीला तिलांजली देऊन, माहिती देणे हा नियम व टाळणे हा अपवाद हे समीकरण स्वीकारण्यात आले. मूलत: सुधारणावादी असलेल्या कायद्याने संपूर्ण व्यवस्था बदल होणार नाही. परंतु निष्क्रिय व सुप्त झालेल्या प्रशासनात मात्र नक्कीच बदल घडवता येईल. माहितीचा अधिकार मिळवण्याचा संघर्षमय व रोमांचक कालखंड संपला आहे व कायद्याच्या अंमलबजावणीचा व त्यातील व्यवाहारिक अडथळ्यांचा, आव्हानात्मक असा कालखंड मात्र सुरू झाला आहे.
देश स्वतंत्र झाल्यानंतरही प्रशासनाची वसाहतवादी चौकट व गोपनियतेची मानसिकता कायम राहिली. पुराव्याचा कायदा, सनदीसेवा वर्तन अधिनियम व कार्यालयीन गुप्ततेचा कायदा यांचा प्रशासनाभोवतीचा विळखा कायम राहिला. यातूनच लोकशाहीबाबत सिद्धान्त व व्यवहार यामध्ये अंतर निर्माण झाले. प्रतिकात्मक लोकशाहीचा अंमल सुरू झाला. भ्रष्ट सार्वजनिक जीवन, उदासीन व हतबल नागरिक, आर्थिक, सामाजिक व नैतिक स्वातंत्र्याअभावी अर्थहीन राजकीय स्वातंत्र्य या सर्व बाबींमुळे सार्वजनिक जीवनाला अवकळा आली.
माहिती कायद्याचे आंतरराष्ट्रीय, राष्ट्रीय संदर्भ
माहितीचा अधिकार कायद्याच्या निर्मिती प्रक्रियेला खèया अर्थाने बळ मिळाले ते १९९० नंतर. जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणेनिधी यासारख्या जागतिक वित्तसंस्थांनी धोरणात्मक पाऊल म्हणून वित्तपुरवठा करताना शासकीय क्षेत्र भ्रष्टाचारमुक्त करण्यासाठी अधिक पारदर्शी बनविण्याची अट विकसनशील राष्ट्रांसमोर ठेवली. १९९० नंतर आशिया खंडात जपान, द. कोरियासह अनेक राष्ट्रांनी हा कायदा अंमलात आणला. परिणामी आज ७० देशांनी या कायद्याचा स्वीकार केला आहे. तसेच नव्वदीचे दशक हे माहितीच्या विस्फोटाचे दशक होते. लोकशाही व माहितीचे प्रकटीकरण यांचा अन्योन्य संबंध या काळात अधिकच स्पष्ट होत गेला. या दशकामध्ये जगभर आंतरराष्ट्रीय धोरणांचा सकारात्मक परिणाम म्हणून माहितीच्या अधिकारांसंबंधीची प्रक्रिया अधिकच गतिमान झाली. लोकशाही विकासाच्या दृष्टीने अलीकडच्या काळातील या सर्वात महत्त्वाच्या घटना आहेत.
या पारदर्शकतेच्या आग्रहाला जनसुनावण्यांचे खास भारतीय रूप देऊन राजस्थानातील मजदूर किसान शक्ती संघटनेने सामाजिक लेखापरिक्षण प्रक्रियेला विधायक वळण दिले. यापासून प्रेरणा घेऊन अनेक संघटनांनी या कायद्याच्या निर्मितीमध्ये दबावगट म्हणून काम केले. सर्वोच्च न्यायालयाने देखील राज्यघटनेतील कलम १९ (१) (क) अन्वये नागरिकांना दिलेल्या भाषण व अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या संदर्भात वेळोवेळी माहितीच्या अधिकाराचा पुरस्कार केला. माहितीचा अधिकार कायद्याच्या निर्मितीला अनेक आंतरराष्ट्रीय संदर्भ होते, तसेच न्यायालयाच्या अनेक निर्णयांचे व विविध चळवळींच्या कार्यकर्तृत्वाचे पाठबळही होते.
दोन दशकापूर्वी माहितीच्या अधिकारासंबंधी चर्चा सुरू झाली असतानाच शासनाने कल्याणकारी राज्याच्या संकल्पनेपासून फारकत घ्यायला सुरुवात केली व खासगीकरणाचा पुरस्कार केला. शासनाचा सार्वजनिक जीवनातून संकोच होत असताना व खासगी क्षेत्राचा विस्तार वाढत असताना, खासगी क्षेत्र या कायद्याच्या बाहेर गेले तर जबाबदाèया झटकलेले शासन मात्र या कायद्याच्या परिघात आले. कायद्यामध्ये सार्वजनिक प्राधिकरणाची व्याख्या करताना समुचित शासनाचे नियंत्रण असलेला qकवा समुचित शासनाकडून प्रत्यक्षपणे व अप्रत्यक्षपणे वित्तपुरवठा होत असलेला निकाय qकवा अशासकीय संघटना, अशी संदिग्धता राहिल्यामुळे अनेक अशासकीय संस्थांनी स्वत:ची सार्वाजनिक प्राधिकरणाच्या व्याख्येतून सुटका करून घेण्याचे प्रयत्न सुरू केले. खासगी क्षेत्राला या कायद्याच्या चौकटीत आणण्यासंदर्भात दक्षिण अफ्रिकेचे उदाहरण उल्लेखनीय आहे.
मागील चार वर्षामध्ये या कायद्यातील तरतुदींचा अन्वायर्थ लावताना अनेक महत्त्वाचे निर्णय केंद्रीय माहिती आयोग, राज्य माहिती आयोग व सर्वोच्च न्यायालय यांच्या परस्परपूरक/छेदक प्रक्रियेतून पुढे येत गेले. यातून कायद्यातील तरतुदींचा अन्वयार्थ अधिक ठळक होत आहे. या कायद्याची व्याप्ती व परिणामकारकता यांचा विचार करता या कायद्याच्या सर्व अंग उपांगाच्या कार्यक्षम अंमलबजावणीसाठी व्यवस्थापकीय चौकट घालून देण्याचे काम अनेक स्तरावर सुरू आहे. कायद्याच्या अंमलबजावणीत येणाèया व्यवाहारिक अडचणीपासून व आंतरराष्ट्रीय अनुभवांपासून धडा घेऊन त्यावर मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
१२ ऑक्टोबर २००५ मध्ये हा कायदा अंमलात आणल्यानंतर केंद्र शासनाने या कायद्याला अनुसरून संस्थात्मक संरचना उभारली. केंद्रीय माहिती आयोग उभारण्यात आला तर प्रत्येक राज्यामध्ये राज्य माहिती आयोगाची स्थापना करण्यात आली आहे. केंद्रीय माहिती आयोगात केंद्रीय मुख्य माहिती आयुक्तांच्या जोडीला माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. राज्य स्तरावर राज्य मुख्य माहिती आयुक्तांच्या जोडीला माहिती आयुक्तांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. महाराष्ट्रात महसूल विभाग निहाय माहिती आयुक्तांची नेमणूक करण्यात आली आहे (नाशिक वगळता). अशा प्रकारची संस्थात्मक संरचना उभारली तरी देखील अंमलबजावणीच्या पातळीवर काही त्रुटी राहिल्या. या त्रुटींचा आढावा घेणे आवश्यक आहे.
या कायद्याच्या प्रचार प्रसाराची जबाबदारी केंद्र व राज्यशासनाची आहे. प्रत्यक्षात शासन याबतीत कमी पडल्याचे जाणवते ग्रामीण लोकसंख्येपैकी केवळ १३% लोकांना व शहरी लोकसंख्येपैकी ३३% या कायद्याची जाणीव आहे. केवळ १२% महिला व २६% पुरुषांना या कायद्याची जाणीव आहे. या कायद्याचा जो काही प्रसार झाला आहे त्यामध्येही प्रसारमाध्यमे, पत्रकार व नागरी संघटनांचा वाटा मोठा आहे, तुलनेने शासनाचा वाटा कमी आहे. राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना (राग्रारोहियो), कुटुंब नियोजन, ग्राहक जागृती कार्यक्रम यांचा प्रसार ज्या धडाडीने केंद्र सरकारने केला, त्याच धर्तीवर माहितीच्या अधिकाराबाबत मोहिम राबवणे आवश्यक आहे. त्याच बरोबर माहिती अधिकार कायद्यातील मूलभूत तत्त्वे अन्य कायद्यामध्ये बंधनकारक करणे गरजेचे आहे. राग्रारोहियो कायद्यानुसार कामाची मागणी करणाèया अर्जदाराला ७ दिवसाच्या आत माहिती देणे बंधनकारक आहे. अशाच पद्धतीने माहिती अधिकार कायद्याची तत्त्वे केंद्रीय पुरस्कृत योजनांमध्येही समाविष्ट करता येतील. राग्रारोहयो च्या माध्यमातून ग्रामीण जनता आपला रोजगाराचा हक्क मिळवू पाहते आहे. तसेच याबाबत सामाजिक लेखापरिक्षणाचा आग्रह धरत आहे अशावेळी सामाजिक लेखापरिक्षणाच्या माध्यमातून निरक्षर घटकांमध्ये माहितीच्या अधिकाराविषयी जाणीव जागृती वाढवता येईल.
माहिती अधिकार कायद्याबाबत नागरिकांमध्ये ज्या प्रमाणात जागृती होते आहे त्याच प्रमाणात अर्जांची संख्या वाढत आहे. या वाढत्या अर्जांच्या संख्येला उत्तर देण्यासाठी जनमाहिती अधिकारी पुरेसे सक्षम नाहीत. महाराष्ट्र राज्य माहिती आयोगाच्या २००८ च्या वार्षिक अहवालानुसार २००६ मध्ये १,२३,००० माहिती अधिकाराचे अर्ज आले होते तर २००८ मध्ये या अर्जांची संख्या वाढून ४,१६,०९० इतकी झाली आहे. त्याच बरोबर विविध माहिती आयोगाच्या कार्यालयाकडे प्रलंबित अपिलांची संख्या ही १४,२,७३ इतकी झाली आहे. केंद्र शासनाकडे आलेल्या अर्जांची संख्या देखील २.५ लाख एवढी आहे. प्रशिक्षण व कार्मिक विभागाच्या (डीओपीटी) अहवालानुसार वाढत्या अर्जांच्या संख्येला तोंड देण्यासाठी अभिलेख व्यवस्थापन, माहितीचे स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटीकरण, माहिती आयोगाने दिलेल्या निर्णयांविषयी अद्ययावत माहिती या गोष्टी कळीच्या ठरू शकतात. प्रत्यक्षात ४३% जनमाहिती अधिकारी अभिलेखव्यवस्थापनाविषयी व माहितीचे स्वयंप्रेरणेने करावयाचे प्रकटीकरण याविषयी अनभिज्ञ आहेत. या कायद्यामुळे कामाचा वाढलेला ताण, अपुरे मनुष्यबळ, निधीची कमतरता यावर उपाय म्हणून दुसèया प्रशासकीय सुधारणा आयोगाने केलेल्या शिफारशीनुसार केंद्र शासनाच्या महत्त्वाच्या योजनांमधील १% निधी हा पाच वर्षासाठी दस्तऐवजांचे अद्ययावतीकरण, पायाभूत सुविधांची उभारणी, मार्गदर्शिका इ कारणासाठी वापरण्यात यावा.
माहितीचा अधिकार कायदा हा गांधीजींची विश्वस्त ही संकल्पना स्वीकारतो. या कायद्यानुसार जनममाहिती अधिकारी हा माहितीचा विश्वस्त आहे. परंतु अहवालानुसार अधिकाèयांच्या दृष्टिकोनात ही विश्वस्तपणाची संकल्पना फारशी प्रतिqबबित झालेली दिसत नाही. बहुतांश जन माहिती अधिकाèयांचा अर्जदाराप्रती दृष्टिकोन हा सहकार्याचा नाही. माहितीच्या अधिकार सक्षमपणे राबविण्यासाठी गोपनियतेची मानसिकता दूर लोटली पाहिजे. अर्जदाराचा त्रास कमी व्हावा यासाठी काही नाविन्यपूर्ण उपक्रमही राबवता येतील. उदाहरणार्थ हरियाना व बिहार मध्ये अर्जदार कॉलसेंटरच्या माध्यमातून आपला अर्ज दाखल करतो व त्याने केलेल्या दूरध्वनीच्या शुल्कामधून अ र्जाची qकमत वसूल केली जाते.
अंमलबजावणीच्या या टप्प्यावर अनेक व्यवस्थापकीय व नावीन्यपूर्ण राबवावे लागतील एकीकडे या कायद्याचे प्रशिक्षण मोठ्या प्रमाणात जन माहिती अधिकारी, सहायक माहिती अधिकारी व अपिलीय अधिकाèयांना ठरावीक कालावधीनंतर देणे आवश्यक आहे. दुसरीकडे जनतेचे कायद्याबाबत मोठ्या प्रमाणात प्रबोधन करणे आवश्यक आहे. या परस्परपूरक प्रक्रियेतूनच सार्वजनिक प्राधिकरण अधिक सक्षम व उत्तरदायी होणार आहे, तसेच जनतेपर्यंतही हा कायदा पोहोचणार आहे. हा कायदा जनतेपर्यंत पोहचवताना महिलांचा विचार प्राधान्याने केला पाहिजे. माहिती अधिकारांतर्गत येणाèया अर्जांमध्ये महिलांचे प्रमाण लक्षणीय रीत्या कमी आहे. प्रलंबित अपिलांची संख्या वाढू नये यासाठी यासाठी माहिती आयोगाचे विकेंद्रीकरण करावे लागणार आहे (महाराष्ट्रात ते आधीच झाले आहे). तसेच कालबद्ध योजना आखावी लागणार आहे. या कायद्याद्वारे राज्यांना व सक्षम प्राधिकाèयांना (उच्च न्यायालये, विधि मंडळे, लोकसभा, राज्यसभा) नियम करण्याचा अधिकार दिला आहे. हे नियम करताना माहिती अधिकार कायद्याच्या मूलभूत तत्त्वांची कोठेही पायमल्ली होता कामा नये. उदाहरणार्थ माहितीच्या अधिकारांतर्गत अर्जदाराला माहिती सहज, सुलभ व अल्पदराने उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. असे असताना पंजाब राज्याने माहितीच्या अर्जाची qकमत रू.५०/- एवढी ठेवली आहे. या कायद्याची विश्वासार्हता कायम राहण्यासाठी माहिती आयुक्तांची नियुक्ती हा अत्यंत कळीचा मुद्दा आहे. माहिती आयुक्ताकडे जाणारे दुसरे अपील हे अंतिम असल्यामुळे माहिती आयुक्त हा निस्पृह, कायद्याचे व्यापक ज्ञान व अनुभव असलेला असला पाहिजे. दुसरा प्रशासकीय सुधारणा आयोगाने शिफारस केल्याप्रमाणे माहिती आयुक्तांची नियुक्ती करताना ५०% पेक्षा अधिक आयुक्त हे प्रशासकीय पाश्र्वभूमी असता कामा नयेत. दुर्दैवाने महाराष्ट्रात बहुतांश माहिती आयुक्त हे प्रशासनाची पाश्र्वभूमी असलेले आहेत. माहिती आयुक्त पद हे निवृत्त सनदी अधिकाèयांचे पुनर्वसन करण्यासाठी तयार केलेले पद आहे असाही आरोप माहिती अधिकार चळवळीतील कार्यकत्र्यांनी केला आहे. माहिती आयुक्त या पदाच्या संदर्भात महिलांनाही प्रतिनिधित्व देणे आवश्यक आहे.
चळवळींच्या प्रयत्नातून निर्माण झालेला हा कायदा आता माहिती अधिकाराशी संबंधित अनेक चळवळींना जन्म देत आहे. अनेक युवक विविध संकेत स्थळांच्या माध्यमातून या मोहिमेशी जोडले जात आहेत. माहिती अधिकार कायद्याबाबतीत शासनाच्या निर्णय प्रक्रियेवर लक्ष ठेवणारे, शासनाच्या धोरणातील व अंमलबजावणीतील उणिवा शोधून काढणारे व त्या उणिवा दूर करण्यासाठी शासनावर दबाव टाकणारे अनेक दबाव गट निर्माण होत आहेत यातच या कायद्याचे यश दडलेले आहे.

(१४ ऑक्टोबर २००९ च्या दैनिक सकाळच्या आवृत्तीत प्रकाशित)


दलित चळवळ : काही समकालीन आव्हाने
- विवेक जाधवर


१९९० नंतरचा कालखंड हा चळवळीच्या र्र्हासाचा कालखंड आहे. या कालखंडामध्ये राज्यसंस्थेने उदारीकरण, जागतिकीकरण खाजगीकरणाचे (-जा-खा) धोरण स्वीकारल्यानंतर आर्थिक संरचनेत त्या अनुषंगाने सामाजिक संरचनेत काही मूलगामी बदल होत आहेत. या बदलाच्या सर्वव्यापी प्रभावाला सामोरे कसे जावे हे कळल्यामुळे दलित चळवळीमध्ये वैचारिक सैरभैरपणा आलेला आहे. कोणतीही चळवळ ही भूमिका, धोरण कृतिकार्यक्रम या तिन्हींवर चालते. या तिन्हींबाबत जर स्पष्टता नसेल तर चळवळ ही उथळ सत्ताकारण वलयांकित व्यक्तिमत्वाभोवती फिरत राहते. दलित चळवळीकडे बदलत्या काळानुरूप आजच्या नवभांडवलशाही विरूद्ध लढण्यासाठी भूमिका, धोरण कृतिकार्यक्रम नसल्यामुळे, ती संसदीय चौकटीतील सत्ताकारण जोडीला अस्मिताकेंद्री राजकारणाभोवती फिरत राहते.
काळाच्या एका टप्प्यावर राजकीय, सामाजिक सांस्कृतिक क्षेत्रात प्रस्थापित व्यवस्थेवर धाक निर्माण करणारी चळवळ आता मात्र प्रभावहीन झाली आहे. नेत्यांची सत्तालालसा, अस्मितादर्शी आरक्षणकेंद्री राजकारण, ऐतिहासिक मिथकांमध्ये अडकलेले अभिनिवेशी राजकारण, बदलणाèया आर्थिक संरचनेबरोबर बदलणाèया सामाजिक संरचनेचे भान नसणे अशा अनेक समस्या दलित चळवळीत दिसून येतात. परंतु पुढील तीन महत्त्वाच्या मुद्यांवरील चर्चा चळवळीच्या काही पैलूवरती प्रकाश टाकू शकेल.
सत्ताबदलातून व्यवस्थाबदलाकडे ?
सत्ताबदलातूनच व्यवस्थाबदलाकडे जाता येईल यावर दलित नेतृत्वाचा अतूट विश्वास आहे. या विश्वासाच्या मुळाशी डॉ. आंबेडकरांनी दलित जनतेला सत्ताधारी वर्ग बनण्याचा केलेला उपदेश त्यांची निर्मिती असलेल्या राज्यघटनेविषयी असणारी कमालीची आस्था यांचा मुख्य वाटा आहे. यातूनच संसदीय राजकारणाच्या चौकटीत निवडणुकांद्वारे सत्ता मिळवण्याचा प्रयत्न दलित नेत्यांनी कायम केला. याच्यामुळे एकीकडे चांगली गोष्ट घडली की दलित चळवळीचे कधी अराजकीयकरण झाले नाही, तर दुसरीकडे दलित नेत्यांचे राजकारण निवडणूककेंद्री बनल्यामुळे, त्यांची जनतेपासूनची नाळ तुटली. याचा आणखी एक परिणाम म्हणजे व्यापक सत्ताबदलासाठी केवळ राजकीय सत्तेच्या तुकड्यांवर संतुष्ट राहता, एकूण वर्ग-जात-स्त्री-दास्यअंतासाठी सर्वहारा वर्गाच्या सहाय्याने जनलढे उभारले पाहिजेत याचा दलितनेत्यांना विसर पडला. याचे सुयोग्य उदाहरण म्हणजे काशीराम मायावती प्रणित बहुजन समाज पक्षाचे राजकारण. बसपाला त्याच्या आतापर्यंतच्या यशाचे श्रेय देऊनसुद्धा व्यापक सत्ताबदलाच्या दृष्टिकोनातून त्यांनी जमातवाद नवभांडवलशाही विरूद्धची आव्हाने कशाप्रकारे समजून घेतली हा प्रश्न उरतोच. मायावतींच्या बहुजनसमाज पक्षाचे राजकारण हे भारतीय संसदीय चौकटीतील नेमक्या उणिवांवर आधारलेले आहे. त्यांची खरी ताकद ही निवडणुकीच्या राजकारणातील उपद्रवमूल्यांत सामावलेली आहे. त्यामुळे या पक्षाच्या राजकारणाच्या मर्यादा या एकूणच भारतीय संसदीय राजकारणाच्या मर्यादा आहेत. काशीरामांच्या काळात या पक्षाला काही तात्त्विक आधार तरी होता. हा आधार आता मायावतीच्या तथाकथितसामाजिक अभियांत्रिकीच्याङ्क प्रयोगाने काढून घेतला आहे. दलितांच्या जातीभानाचा स्वत:च्या वैयक्तिक महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी वापर करतानाच त्यांनी सरंजामी भांडवली नेतृत्वाशी हातमिळवणी केली आहे. हे करताना त्यांनी जातीबध्द समाज नवभांडवलशहीमुळे निर्माण होणाèया आव्हानांकडे दुर्लक्ष केले आहे. त्यामुळे मायावतीच्या यशाचे विश्लेषण हे दलितांच्या व्यापक हिताच्या दृष्टिकोनातून करण्याऐवजी ते त्यांच्या वैयक्तिक कर्तृत्वाच्या परिघात करावे लागते. बसपाच्या या यशस्वी राजकारणामळे महाराष्ट्रातील दलित नेतृत्वाचा सत्तापरिवर्तन म्हणजे व्यवस्थापरिवर्तन यावरील त्यांचा विश्वास दृढ झाला आहे. या दृष्टीने सत्ता हे साधन राहता साध्य बनले आहे.
वर्ग महत्त्वाचा की जात ?
दलित चळवळीची दिशा ही वर्गाधारित ठेवायची की जातीआधारित ठेवायची हा चळवळीच्या प्रारंभापासूनचा प्रश्न जागतिकीकरणानंतर निर्णायक वळणावर येऊन ठेपला आहे. हा केवळ तात्त्विक प्रश्न नाही, तर चळवळीचे पुढील काळातील स्वरूप निश्चित करणारा हा प्रश्न आहे. या द्वंद्वाला आंबेडकरांनाही सामोरे जावे लागले होते. दलित चळवळीला जात प्रादेशिकता ओलांडून, शोषित जाती वर्गामध्ये आपला पाया विस्तारायचा असेल तर, यापुढे जातीविरोधी लढा वर्गलढ्याबरोबर पुढे न्यावा लागेल. जातीविरोधी लढ्यातील वर्गीय बाजू दलितचळवळीने कायम दुर्लक्षित ठेवली होती. याला अपवाद केवळ दादासाहेब गायकवाडांच्या भूमी सत्याग्रहाचा दलित पँथरच्या प्रारंभीच्या काळाचा. दादासाहेब गायकवाडांनी जमिनीच्या फेरवाटपाच्या मुद्यावर आंदोलन करून दलित चळवळ ही सर्व शोषक जाती-वर्गाची चळवळ बनवण्याचा प्रयत्न केला. त्यांच्या आंदोलनाने साम्यवादी समाजवादी चळवळींशी नाते जोडले. या आंदोलनाने दलितांच्या इतिहासात प्रथमच जात उत्पादन साधनांचा संबंध कृतिकार्यक्रमाच्या स्तरावर अधोरेखित केला गेला. तत्कालीन शहरी दलित नेतृत्वाने दादासाहेबांनाच अराजकतावादी ठरवून स्वत: संसदीय राजकारणाची वाट चोखाळली. याच प्रस्थापितमध्यमवर्गीयङ्क नेतृत्वाच्या विरोधात १९७०च्या दशकात बंड पुकारून नामदेव ढसाळने दलित पँथरची स्थापना केली. या दलित पँथरच्या जाहिरनाम्यावरून दलित पँथरची सर्व शोषित जाती-वर्गाविषयी आस्था प्रकट होते. दलित पँथरने त्या काळात राज्यसंस्था उच्च जात-वर्ग यांच्या विरोधात वापरलेली लढाऊ भाषा आक्रमकपणा साहित्य, कलेपासून ते नाटक राजकारणापर्यंत पसरले. परंतु हे लढाऊ पर्वाचे तारू पुन्हा जात की वर्ग या मुद्यावर येऊन फुटले. नामदेव ढसाळांवरही कम्युनिस्ट असल्याचा आरोप करून दलित पँथर फुटली. यानंतरच्या काळात दलित चळवळ समता परिवर्तनाच्या मुद्यापासून दूर गेली आरक्षणकेंद्री दलित राजकारणात अडकली. जातीविरोधी लढ्यातील वर्गीय बाजूकडे ज्याप्रमाणे दलित चळवळीने दुर्लक्ष केले, त्याचप्रमाणे साम्यवाद्यांनीही वर्गीय लढ्यात जातीला दुय्यम स्थान दिले. जात हा पायाचा भाग नसून इमल्याचा भाग आहे आणि त्यामुळे वर्गलढा हाच खराखुरा लढा असून, यातूनच जातीअंतही होईल यावर साम्यवाद्यांचा विश्वास होता. साम्यवाद्यांच्या तात्त्विक धारणेतील चूक सर्वप्रथम शरद पाटलांनी दाखवून दिली साम्यवादी नेतृत्वाचा उच्चभ्रूपणा उघड केला. त्यांनी पारंपारिक ऐतिहासिक भौतिकवाद हा वर्ग ही एकच शोषण संस्था मानत असल्यामुळे, त्याला वर्गोदयापूर्वीच्या वर्ण जात या शोषण संस्थाची जोड देऊन एकप्रवाही ऐतिहासिक भौतिकवाद फुले-आंबेडकरांची जोड देऊन बहुप्रवाही केला.
१९९० नंतरच्या कालखंडामध्ये तर जातीविरोधी दलित चळवळीचा भौतिक आशय अधिकाधिक स्पष्ट करणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने जात वर्ग यांचे परस्परसंबंध समजून घेऊन त्या आधारे उत्पादनसंबंधावरील मालकीचे विश्लेषण झाले पाहिजे, तरच जागतिकीकरणाच्या शोषितांवरील परिणामांचे विश्लेषण करणे शक्य होईल. ब्रिटिशकाळातील साम्राज्यवादाबरोबर आलेले पाश्चात्य विचार शिक्षण यांच्यामुळे तो साम्राज्यवाद काही दलितांना मुक्तिदायी वाटला. त्याच धर्तीवर आजचा जागतिकीकरणरूपीनवसाम्राज्यवादङ्क देखील चंद्रभानप्रसादसारख्या दलित नेत्यांना मुक्तिदायी वाटतो. यातून वाढत्या विषमतेकडे दुर्लक्ष करून संघर्षाऐवजी प्रस्थापित व्यवस्थेत विरघळून जाण्याचा मार्ग पत्करला जात आहे. युरोपात ज्याप्रमाणे भांडवली शक्तींनी सरंजामी व्यवस्था उखडून टाकली, त्याचप्रमाणे भारतात देखील याची पुनरावृत्ती होऊन सरंजामी व्यवस्थेचे अवशेष त्यावर आधारलेली जातीव्यवस्था समाप्त होईल अशी आशा काहींना वाटते. प्रत्यक्षात या सरंजामीव्यवस्थेच्या आधारे भांडवलीव्यवस्था पसरत आहे.
जागतिकीकरणाच्या काळापूर्वी कल्याणकारी राज्याच्या कल्पनेत दलितांना हक्क मागण्याचा अवकाश तरी होता, कल्याणकारी राज्याच्या अस्ताबरोबरच हा अवकाश ही हिरावून घेतला जातो आहे. या संकुचित होत जाणाèया अवकाशाबरोबरच संसदीय राजकारणाचा उपयोगही मर्यादित होत आहे.
आरक्षणकेंद्री राजकारण
या कालखंडातील आरक्षणाला विरोध करणाèया गुणवत्तेचे महत्त्व, स्पर्धात्मक तत्त्व यासारख्या गोंडस शब्दांच्या आड लपलेल्या सोशल डार्विनिझमला उघडे पाडले पहिजे. परंतु हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे की आरक्षण हे दुधारी हत्यार आहे एकीकडे ते दलितांना मुख्यप्रवाहात आणण्यासाठी किमान संधी देते, तर दुसरीकडे जातीला अधिमान्यता देऊन जातीविनाशाच्या तत्त्वाला हरताळ फासते. मंडल आयोगानंतर आरक्षणाच्या धोरणाला व्यापक संमती मिळाली आहे, त्या आधारे दलितांचे सर्व मूलभूत प्रश्न आरक्षणाच्या वर्तुळात बद्ध करून, त्याप्रश्नाचे सुलभीकरण करण्यात जनलढे थांबवण्यात राज्यसंस्था कमालीचे यशस्वी झाली आहे. दलितपँथर नंतरची दलितचळवळ आरक्षणाचा हा पैलू समर्थपणे समजू शकली नाही.
एकूणच, महाराष्ट्रातील दलित चळवळीने सखोल आत्मपरिक्षण करणे गरजेचे आहे.
( ऑगस्त २००८ मध्ये दैनिक सकाळमध्ये प्रकाशित )